पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जय महाराष्ट्र

जेव्हा झारखंड राज्य तयार झाले तेव्हा उत्तर प्रदेश मध्ये भाजपाचे राज्य होते. जेव्हा तेलंगणा राज्य तयार झाले तेव्हा आंध्र प्रदेश मध्ये कॉंग्रेस चे राज्य होते. राष्ट्रीय पक्ष जेव्हा एखाद्या राज्यात बहुमतात असतो तेव्हा तो पक्ष त्याच्या राष्ट्रीय पातळीवरच्या फायद्यासाठी अशा कृती करतात. आणि काही गोष्टी मुद्दामून डावलतात. उदाहरणार्थ- नर्मदा वाद, बेळगाव सीमावाद. ह्या आपल्या संयुक्त महाराष्ट्रसाठी १०५ लोकांनी आहुती दिली आहे. कृपा करून ती वय जाऊ देयू नका. दस्तुरखुद भारताचे पंतप्रधानही म्हणतात की जेव्हा महाराष्ट्राची प्रगती होते तेव्हा भारताचीही प्रगती होते. आणि महाराष्ट्राची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राची प्रत्येक माती प्रत्येक पुकार एक असेल. म्हणून कृपा करून  ह्या संयुक्त महाराष्ट्रासाठी मत करा ह्या देशासाठी मत करा. कोणत्या एका पक्ष्यासाठी मत करू नका. ह्या महाराष्ट्राला प्रसिध्द सरकार नकोय संतुलित सरकार हवय. जय महाराष्ट्र  

मी

इमेज
मी,  कधी स्वतःचाच गुन्हेगार , तर कधी स्वतःचाच  पाठीराखा, देहातल्या प्रत्येक पेशीला न्याय देणारा  त्यांचाच जन्मदाता, तर कधी मेलेल्या कातडीची जळती चिता, मी, कुणाच्या नजरेत  हमीदार बेवारस सत्याचा , तर कुणाच्या डोळ्यात,  साथीदार  सनातनी कायद्यांचा  पण काचेतून हस्तांतरित झालेला प्रकाशकिरण  देऊन जातो वेगळीच नजर,  त्यावरच जगतो मी  जसे जगतात ना सजीव प्राणवायूवर  अगदी तसाच मी, कवितेला उगम देणारा, विविध भावनांनी प्रवाहित करणारा  त्याच वेळी तिला दाद देणारा  पण शब्दांना धार देताना  त्यांच्या वेदना सहन करणाराही मीच  मी , माझ्या दृष्टीने, हस्त नक्षत्रातल्या मयुराबरोबर नाचणारा, तर कधी काकस्पर्शाबरोबर मयताच्या इच्छांना  अन बाकीच्यांच्या समजुती पूर्ण करणारा  मला नकोय अनुमती , ना दिलगिरी  फक्त हवीय साथ  विरोधही चालेल  पण पाहिजेय फक्त प्रामाणिकता  त्यासाठी माझा चष्मा दरवेळी पुसावा लागेल … …