जय महाराष्ट्र

जेव्हा झारखंड राज्य तयार झाले तेव्हा उत्तर प्रदेश मध्ये भाजपाचे राज्य होते.
जेव्हा तेलंगणा राज्य तयार झाले तेव्हा आंध्र प्रदेश मध्ये कॉंग्रेस चे राज्य होते.
राष्ट्रीय पक्ष जेव्हा एखाद्या राज्यात बहुमतात असतो तेव्हा तो पक्ष त्याच्या राष्ट्रीय पातळीवरच्या फायद्यासाठी अशा कृती करतात. आणि काही गोष्टी मुद्दामून डावलतात. उदाहरणार्थ- नर्मदा वाद, बेळगाव सीमावाद.
ह्या आपल्या संयुक्त महाराष्ट्रसाठी १०५ लोकांनी आहुती दिली आहे. कृपा करून ती वय जाऊ देयू नका. दस्तुरखुद भारताचे पंतप्रधानही म्हणतात की जेव्हा महाराष्ट्राची प्रगती होते तेव्हा भारताचीही प्रगती होते. आणि महाराष्ट्राची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राची प्रत्येक माती प्रत्येक पुकार एक असेल. म्हणून कृपा करून  ह्या संयुक्त महाराष्ट्रासाठी मत करा ह्या देशासाठी मत करा. कोणत्या एका पक्ष्यासाठी मत करू नका. ह्या महाराष्ट्राला प्रसिध्द सरकार नकोय संतुलित सरकार हवय.

जय महाराष्ट्र  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience