पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये

इमेज
पहाट  हरवलीय मुक्तीच्या पाखरांबरोबर , तुझ्यासवेत मी पाहतोय तुम्हाला जाताना वेडा वारा सैरभैर नाचताना उगवती रोपटी पाणावलीत भैरव गाताना दवबिंदूच अस्तित्वच मिटल विटल उत्साहाच रक्त पानांच्या देटात उरते निर्जीव रसायन फक्त रिकाम होत मनाच  हिरेजडीत तख्त मृगजळ दगा देतो दिसते आशेची विस्कटलेली माती आता अंधुकशी झालेली पहाटही हिरावून घेतेय गोड स्वप्न पहाटेची राहतो एकांत माथी नजरेला असतेच ना प्रतीक्षा येशील तू तिन्हीसांजेला  मग गातील रोपटी मारवा  अनुभवेल मन हेमंतचा गारवा भेटेल प्रेमाची मुक्ती दवबिंदू चकाकतील आकाशी भावी ऋणबंध उमटतील माथी यायचं असेल तर संध्याकाळीच ये ह्या डोळ्यांनाही घेऊ दे ना तुझ सुख कारण स्वप्न बघताना ते मिटातात आणि उघडतात तेव्हा … तू नसतेस

अदृश्य शक्ती

अखंड तपस्या से मिलता हु मै लोग कहते है , मै  हु लालची भक्ती पार हि देता हु हर चीज , होता हु क्रोधीत तो लेता हु जान  डरता है कोई तो कोई करता है स्वार्थ …. लेकिन मै तो हु  रोशनी अंधे कि  शुभवाणी मुख कि  चाहत खुशियो कि  मै  तो रहता हु सदा  फुलों के सुगंध मे, मधुमख्खि के शहद मे, हर एक सच्चाई मे ढूंढते है मुझे हर क्षण हर कण मे, अरे ढूंढो मुझे अपनी जिंदगी मे   मिलुंगा मै तुम्हारी उम्मीदों मे  ना करो हत्या किसी कि ना बाटो मुझको  मै तो सब का हु  और तुम सब मेरे …… 

घेऊन चल

इमेज
किती दिवस गहाण  ठेवणार आहेस अंधाऱ्या रात्रीकडे तुझ्याशिवाय रातराणीचा सुवास निर्जीव, गुदमरतो तुझ्या श्वासाविन जीवाचा जीव त्याला श्वास  देण्यासाठी तर घेऊन चल पुसटश्या चांद्रयप्रकाशावर उटते तुझ्या परछायेची नक्षी मग गातो मनातला पक्षी तुझी उष्टी गाणी माझ्यातली तू येतेस डोळे बंद करून घेऊन जातेस दूरदेशी आभास हे सत्यात आणण्यासाठी तर घेऊन चल तुझ्या विरहाची वटवाघुळे येतात मनाच्या उंबरठ्यावर आवाजाने त्यांच्या पाखरू प्रेमाचे बिथरते मग कुण्याकाळची वचने उमटतात ओठांवर त्यांना अर्थ देण्यासाठी तर घेऊन चल बघ पहाट आली पावलांपाशी जणु मरणच घेऊन आलीय अदृश्य मरण .. सरणाशिवाय जळत सर्वस्व उरत ते कटू सत्य वाटत यावीस तू अन मारावीस मिठी पहाटेच्या आधी कुशीत घेण्यासाठी तर घेऊन चल मलाही उगवता सूर्य बघायचा आहे पण तुझ्याबरोबर   

जय महाराष्ट्र

जेव्हा झारखंड राज्य तयार झाले तेव्हा उत्तर प्रदेश मध्ये भाजपाचे राज्य होते. जेव्हा तेलंगणा राज्य तयार झाले तेव्हा आंध्र प्रदेश मध्ये कॉंग्रेस चे राज्य होते. राष्ट्रीय पक्ष जेव्हा एखाद्या राज्यात बहुमतात असतो तेव्हा तो पक्ष त्याच्या राष्ट्रीय पातळीवरच्या फायद्यासाठी अशा कृती करतात. आणि काही गोष्टी मुद्दामून डावलतात. उदाहरणार्थ- नर्मदा वाद, बेळगाव सीमावाद. ह्या आपल्या संयुक्त महाराष्ट्रसाठी १०५ लोकांनी आहुती दिली आहे. कृपा करून ती वय जाऊ देयू नका. दस्तुरखुद भारताचे पंतप्रधानही म्हणतात की जेव्हा महाराष्ट्राची प्रगती होते तेव्हा भारताचीही प्रगती होते. आणि महाराष्ट्राची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राची प्रत्येक माती प्रत्येक पुकार एक असेल. म्हणून कृपा करून  ह्या संयुक्त महाराष्ट्रासाठी मत करा ह्या देशासाठी मत करा. कोणत्या एका पक्ष्यासाठी मत करू नका. ह्या महाराष्ट्राला प्रसिध्द सरकार नकोय संतुलित सरकार हवय. जय महाराष्ट्र  

मी

इमेज
मी,  कधी स्वतःचाच गुन्हेगार , तर कधी स्वतःचाच  पाठीराखा, देहातल्या प्रत्येक पेशीला न्याय देणारा  त्यांचाच जन्मदाता, तर कधी मेलेल्या कातडीची जळती चिता, मी, कुणाच्या नजरेत  हमीदार बेवारस सत्याचा , तर कुणाच्या डोळ्यात,  साथीदार  सनातनी कायद्यांचा  पण काचेतून हस्तांतरित झालेला प्रकाशकिरण  देऊन जातो वेगळीच नजर,  त्यावरच जगतो मी  जसे जगतात ना सजीव प्राणवायूवर  अगदी तसाच मी, कवितेला उगम देणारा, विविध भावनांनी प्रवाहित करणारा  त्याच वेळी तिला दाद देणारा  पण शब्दांना धार देताना  त्यांच्या वेदना सहन करणाराही मीच  मी , माझ्या दृष्टीने, हस्त नक्षत्रातल्या मयुराबरोबर नाचणारा, तर कधी काकस्पर्शाबरोबर मयताच्या इच्छांना  अन बाकीच्यांच्या समजुती पूर्ण करणारा  मला नकोय अनुमती , ना दिलगिरी  फक्त हवीय साथ  विरोधही चालेल  पण पाहिजेय फक्त प्रामाणिकता  त्यासाठी माझा चष्मा दरवेळी पुसावा लागेल … … 

तेरा साथ

इमेज
निले गगन के नीचे तुझे देखा , तो दिल करता है  कि दिल किहि चद्दर को तेरा घुंगट बनादु छुपालु  पागल सुरज से कुचही पल गये फिर भी लगता है कई साल हुये तुझे देख के चेहरे कि मुस्कान अभीभी मरम्मत करता  है बिछडने के दर्द कि पर ये खुदा डाल दे जहान्नम पर, मना मत कर इस महोब्बत को, अब ना डारा इस  मौत से क्यू की इस प्यार मैं तो उसकी  आदतसी हो गयी है

गोड रात्र

इमेज
चांदण्या रात्री काळ्या नभांखाली   तिमिराची ओढणी बाजूला सारून ओळखलस मला  बघताच तुला  ओवावी हृदयाची चादर  लपवावं चंद्रदृष्टीपासून  मी अचंबित, अगणित  डोळे अबोल  मनात खळबळ सौंदर्य तुझ शोषून घ्याव सर्वांगाने थांबावी मग खळबळ डोळ्यांनीही घ्यावा बोलकेपणा तुझे स्वर पडता कानी  थरथरल मन  कम्पला जीव विस्तीर्ण भूतलावरच्या किडूक मिडूक जिंदगानीला द्याव एक अभय पुर्नजन्मचा तू घेता अलगद मिठीत व्हावा साक्षात्कार सजीव असल्याचा नवी उमेद ती जगण्याची मिळावी याच वेळी तुझ्या कुशीत मनाच वार्धक्य मिटाव उगवाव नवांकुर तुझ्या नावच ……

आठवण तुझ्या क्षणांची

इमेज
एक क्षण यावा अन दवबिंदूची वाफ न होता मुरावीत पानापानात असाच एक क्षण यावा विरघळून जाव माझपण तुझ्या नसानसात नको तो शोध मृगजळाच्या सौंदर्याचा हवाय फक्त तुझ्यातला माझा दर्या एक क्षण यावा अन सूर्यानेही द्यावे शीतल हास्य मिठागरांनाही यावी भरती असाच एक क्षण यावा, अश्रूंना मिळावा दिलासा तुझ्या कुशीचा ते निमित्त मुक्त कवडसांच्या मिलनाच दोघांच्या देहावर विसावलेल्या एक क्षण यावा अन सुर्यफुलाही सापडावा नवा पर्याय जगण्याचा तोडावा दोर खगयाच्या बंधनाचा असाच एक क्षण यावा, एकवटावा माझ्या जगण्याचा हेतू तुझ्या अस्तित्वावर, विसराव आत्म्याचं असण लपायला मिळाव त्याला तुझ्या हृदयाच आंगण एक क्षण यावा अन बाकीचे क्षण व्हावेत आनंदी करावा निसर्गाचा सत्कार अनंतासाठी याव चैतन्य भूतलावर असाच एक क्षण यावा माझे क्षण व्हावेत तुझे तुझे ……  दीर्घायुषी! अन उतरावा जीव तुझ्या पेशींमध्ये,…

भास

ती भासे मज विद्युलता, नकट्या सरी बरसती लाली बनुन रही ती त्यांच्या मस्तिश्कावरी. मी सुनवतो तमाला “अरे हीच ती नयनदृष्टी, ... आदित्याविस्कार, तुला पुरुन उरे.” ती भासे मज मंद ज्योत रणरागिणी विजयचि प्रेरणा उत्सहाचि मी विनवतो देवाला, “तुजे नि माजे चित्त न गमते तिच्यापरि... तरि का जिव दोघांचा ही तिच्याविन तग धरी?” ती भासे मज अनंताची वाहिनी सागराचा उगम वत्सल्यच आंगण मज न उमजे ती परि तिस जानवे अंतरिचे भाव मी ठणकावे स्वःतालच, “तू याचना ती दिलासा तू घृणा ती माया तू एकरंगी आकाश ती सप्तरंगी इंद्रधनुष.” अंति खरे सत्य हे, मृत्यु न उरे जन्मापरि मी नसे माझा ... तिच्यापरि...

घर

इमेज
घर.... एक स्वप्न घाम गाळणाय्रांसाठी , रक्ताचे शिंतोडे उडवणाय्रांसाठी … जीवनची इंद्रीये विकून , उरलीसुरली अवयवे भाड्याने देऊन वसवलेल स्वतःच घर जणु कबीरची नगरीचं.... शेवटी स्वप्नांना आशेचा किरण भेटतो … स्वप्न सत्यात उतरलली दिसतात पण..... शेवटी तोच क्ष-किरण बनून स्वप्नांना छेदून दूर अनंतात जातो कोणत्याही अडथ्ळ्यशिवाय..... अन् इमारत कोसळ्ते..... त्यांच्या अस्तित्वाचा साधा पुरावही उरत नाही , उरतो तो कोंद्ट घोषणांचा उच्छाद ,,,, आमच्याकडे असतो तो एक शोकांकित श्वास , सांत्वनात गुंतलेल मन , एका मिनिटच्या विनोदनं स्थिरस्थावर होणार... अन् ज्यांच्याकडे काही नसत , त्यांच मन हिजड झालेल असत..